गांधीनगर: २०१९ ची निवडणूक कॉंग्रेस जिंकणार असून आम्ही सत्तेवर आल्यास जीएसटीचे दर एकसमान करु, कॉंग्रेस आणि जनतेच्या दबावामुळेच काल दर कमी झाले असं कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी सांगितलं आहे. राहूल गांधी तीन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आले असून या दौर्यात ते सहा जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. जीएसटीमुळे देशातील लाखो तरुण बेरोजगार झाले. या कर पद्धतीत बदल करायला आणखी वाव आहे. या कर पद्धतीत पाच टप्पे आहेत. या ऐवजी एकच टप्पा हवा आहे. अए ते म्हणाले. गांधी यांनी गांधीनगरात सभा घेतली. त्यापूर्वी त्यांनी अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी व्यापार्यांशीही संवाद साधला. जीएसटीचा फटका गुजरात निवडणुकीत बसू शकतो याचा अंदाज आल्यानेच ही कपात करण्यात आली असाही आरोप केला जात आहे. गुजरात दौर्यात राहूल गांधी गांधीनगर, साबरकांठा, बनासकांठा, पाटण, अरवल्ली और महेसाना या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. मोदी आणि राहूल गांधी यांनी मंदिरांना भेटी देण्यावर जोर दिला आहे. वर्षभरात मोदींनी १८ मंदिरांना तर गांधी यांनी २५ मंदिरांना भेटी दिल्या आहेत.
Comments