HOME   महत्वाच्या घडामोडी

वैशालीताई बिनविरोध, कर्जमाफी: कही खुशी कही गम, देशाला आणखी नागरिकांची गरज? पहाटे पाचपर्यंत मिळणार दारु, नागरिकत्व कायद्याचे ११ बळी.....२२ डिसेंबर १९


वैशालीताई बिनविरोध, कर्जमाफी: कही खुशी कही गम, देशाला आणखी नागरिकांची गरज? पहाटे पाचपर्यंत मिळणार दारु, नागरिकत्व कायद्याचे ११ बळी.....२२ डिसेंबर १९

* निलंगा जवळील सुलतान टेकडीजवळ तुषार सर्जे याचा चाकूने भोसकून खून
* जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षक संघानं केलं लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
* विलास कारखान्याच्या निवडणुकीत वैशालीताई, आ. अमित देशमुख यांच्यासह आठजण बिनविरोध
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली शेतकरी कर्जमाफीची घोषणा
* दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ, मार्चपासून होणार सुरुवात
* शेतकर्‍यांच्या नवीन कर्जमाफीबद्दल राजू शेट्टी असमाधानी
* फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेत फारसा फरक नाही- रघुनाथ पाटील
* नव्या कर्जमाफी योजनेसाठी लागणार साठ हजार कोटींपेक्षा अधिक निधी
* सोमवारी होणार राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार
* गृहखाते शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता
* अण्णा हजारे यांचे मौनव्रत सुरु, भेटीला येणार्‍यांसोबत लिखित संवाद
* आज दिल्लीतल्या रामलिला मैदानावर रॅली, पंतप्रधान साधणार संवाद
* भाजपा प्रत्येक कुटुंबात जाऊन सांगणार नागरिकत्व कायद्याचे पायदे, दहा दिवसांचे अभियान
* देशातील गंभीर विषयांवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय- शरद पवार
* १३५ कोटींच्या देशाला आणखी नागरिकांची गरज आहे का? राज ठाकरे यांचा प्रश्न
* नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलनातील बळींची संख्या गेला ११ वर
* नागरिकत्व विरोधी कायद्याच्या विरोधातील परभणी येथील आंदोलनात ५० जणांना अटक
* नाताळ आणि नववर्षानिमित्त रात्री एकपर्यंत दारु दुकाने खुली राहणार, बारसेवा पहाटे पाचपर्यंत सुरु ठेवण्यास मंजुरी
* वेस्ट इंडीज आणि भारतादरम्यानचा शेवटचा सामना आज कटकमध्ये


Comments

Top