HOME   टॉप स्टोरी

मोदी सरकारचा कार्पोरेट भ्रष्टाचार, सवलती द्यायच्या अन देणग्या घ्यायच्या

निवडणूक आयोगानं त्यांच्या पार्टीचं ऑडीट करावं- प्रकाश आंबेडकर


लातूर: भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी लातुरच्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर घणाघाती आघात केले. कॉग्रेस सरकारपेक्षा या सरकारचा भ्रष्टाचार वेगळ आणि भयंकर आहे. कार्पोरेट जगताला हाताशी धरुन हे सरकार माया कमावित आहे. रिलायन्सला एवढी मदत कशी काय मिळते? असा प्रश्न त्यांनी केला. न खाने दूंगा ना खाऊंगा असं ते म्हणतात पण सबकुछ मै ही लुंगा अशी त्यांची निती आहे. कार्पोरेट जगताला हव्या त्या सवलती द्यायच्या आणि त्यांच्याकडून पार्टीसाठी फंडींग घ्यायचं असा त्यांचा कारभार चालतो. निवडणूक आयोगही धुतल्या तांदळासारखा नाही. एकदा यांच्या पक्षाचं ऑडीट निवडणूक आयोगानं करावं आणि पंतप्रधानांनी मन की बातमध्ये याबद्दल सांगून टाकावं असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं.


Comments

Top