लातूर: लातुरचे पालकमंत्री आणि खासदार यांनी आज सुरु झालेल्या बीदर-कोल्हापूर रेल्वेचं लातूर स्थानकावर स्वागत केलं. खासदार सुनील गायवाड तर या गाडीत उदगीरहून बसून आले होते! या दोघांनी या गाडीच्या आगमनाची विधीवत पूजा केली, श्रीफळ वाढवलं. या दोघांनीही आम्ही एकाच मुलाखतीत बोलते केले. या दोघांनाही लातूर-मुंबई गाडीचं कसलंही सोयरसुतक नव्हतं. उलट लातुरहून २० नव्या गाड्या सुरु झाल्या आहेत असं सांगत लातूर-मुंबई गाडी बंद पडलीच नाही असे सांगण्याचा पराक्रमही केला. आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप यांनी रोखठोकपणे या दोघांचीही मुलाखत घेतली पण दोघांनीही जगताप यांच्यावर मात केली! व्यवस्थितपणे वेळ मारुन नेली.
Comments