HOME   व्हिडिओ न्यूज

प्रशासन कोर्टाचेही ऐकेना: गोलाईतल्या टपरीधारकांचं पुनर्वसन

गोलाईतून उचलून गांधी मैदानाला आणलं, तिथूनही हुसकावलं, आता जायचं कुठं?


लातूर: लातुरची गंजगोलाई म्हणजे लातुरची आर्थिक राजधानी. १९९८ पासून या गोलाईतला एक मोठा प्रश्न रेंगाळत पडलाय. १६२ भाडेकरु टपरीधारकांना विस्थापित केलं गेलं. पुनर्वसनाची कसलीही व्यवस्था न करता ही कारवाई झाली. पुढे पुनर्वसन झालेच नाही. उच्च न्यायालयाने आदेश दिले, सर्वोच्च न्यायालयानेही दिले पण त्याची अमलबजावणी होत नाही. तारखांना नीट उपस्थिती नसते. प्रशासन आणि राज्यकर्त्यांना नेमकं काय करायचं आहे असा संतापजनक सवाल १६२ टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष जमील नाना यांनी केले. आता आत्मदहन हा एकच उपाय उरला आहे असे त्यांनी सांगितले.


Comments

Top