HOME   व्हिडिओ न्यूज

काय बोलले आदित्य ठाकरे माध्यमांशी?

भेद न करता दुष्काळग्रस्तांना मदत, वादाचे विषय टाळले!


लातूर: नांदेड, परभणी, हिंगोली, पालघर असे अनेक जिल्हे फिरलो, सगळीकडेच दुष्काळाची स्थिती आहे. शिवसेना कसलाही भेद न करता महाराष्ट्राच्या हाकेला धावून आली आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, पशुखाद्य वितरण चालले आहे. इतर पक्ष, सेवाभावी संस्थाही असंच काम करीत असतील असं आदित्य ठाकरे म्हणाले. या दुष्काळ दौर्‍यात त्यांनी पेठ, चलबुर्गा आणि किल्लारी या गावांना भेटी दिल्या. दुष्काळग्रस्तांसाठी आणलेली मदत वितरीत केली. पीक विमा व कर्जमाफीबद्दल निवेदने येत आहेत. इतकंच ते बोलले, बाकी वादाच्या विषयांना बगल दिली.


Comments

Top