HOME   टॉप स्टोरी

नारायण राणेंच्या पुतळ्याचं दहन

लातुरातील मराठा कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द, संताप झाला व्यक्त


लातूर: मराठा आरक्षणाचं प्रकरण आता चिघळ्त चाललंय. शांतीपूर्ण ५८ मोर्च्यांचं नियोजन करुनही सरकारला त्याची दाद घ्यावी वाटली नाही याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे मूक मोर्चांऐवजी ठोक मोर्चा सुरु झाला आहे. काल लातुरच्या मराठा क्रांती भवनात राज्यातील सर्व जिल्ह्यातील समन्वयकांची बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी लातुरकरांबद्दल अपशब्द वापरले. त्याची प्रतिक्रिया म्हणून कार्यकर्त्यांनी आज मराठा क्रांती भवनाच्या प्रवेशद्वाराजवळच राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.


Comments

Top