HOME   टॉप स्टोरी

अपूर्वा यादव खून प्रकरण जलदगती न्यायायात चालवावं

लातुरात नागरिक-तरूण-तरुणींनी काढला कॅंडल मार्च, पोलिसांकडून अपेक्षा


लातूर: लातुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपूर्वा यादव या तरुणीच्या अमानुष हत्येप्रकरणी आज आंबेडकर पार्क ते शिवाजी चौक असा कॅंडल मार्च काढण्यात आला. तरुणी, लहान मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. याला वेळीच लगाम घातला पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अपूर्वा प्रकरण जलतगती न्यायालयात चालवावे, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी प्रा. युवराज धसवाडीकर यांनी केली. या मार्चमध्ये संवेदनशील तरुण, तरुणी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Comments

Top