HOME   टॉप स्टोरी

दुष्काळाशी सामना आपल्यालाच करावा लागेल!

सरकार काही करीत नाही, आता पुन्हा रेल्वेने पाणी शक्य नाही- आ. अमित देशमुख


लातूर: आ. अमित देशमुख यांनी आजलातूरच्या प्रेक्षकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुष्काळाचा सामना आपल्यालाच करावा लागेल असे ते म्हणाले. सरकारने पळवाटा काढून दुष्काळ जाहीर केला. सरकारने तातडीने सबंध महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करायला हवा होता. सरकार दुष्काळ निवारणासाठी योग्य उपाय योजना करायला तयार नाही, पाण्याअभावी ऊस जळतोय त्या शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा उपाय सरकारने करावा, परिस्थिती आणखीच बिघडली तर लातुरला पुन्हा रेल्वेने पाणी येणे शक्य नाही. कारण आता लगेचच निवडणुका नाहीत. सरकार काही करीत नाहीत. आता दुष्काळाचा सामना आपल्यालाच करावा लागेल असे अमित देशमुख यांनी ‘आजलातूर’शी बोलताना सांगितले.


Comments

Top