HOME   व्हिडिओ न्यूज

अल्टीमेटम न पाळल्यास ३५ ठिकाणी निवडणुका लढवणार- लिंगायत महासंघ

लिंगायतांसह चार समाजांना कसे मिळणार आरक्षण? सुदर्शन बिराजदारांशी थेट संवाद


लातूर: लिंगायत, वीरशैव आणि वाणी नावे तीन आहेत पण जात एकच आहे.
सरकारने वाणी नावाने नोंद असणार्‍यांना आरक्षण दिले. पण लिंगायत आणि वीरशैव बाजुला पडले.
त्यांनाही सारखेच आरक्षण मिळावे यासाठी प्रा. सुदर्शन बिराजदार प्रणित लिंगायत महासंघाने सरकारला ३० तारखेचा अल्टीमेटम दिला आहे.
तो पाळला न गेल्यास राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जमेल त्या पद्धतीने आंदोलने करु, येत्या विधानसभेत ३५ मतदारसंघात निवडणूक लढवू असा इशारा प्रा. सुदर्शन बिराजदार यांनी दिला आहे.
त्यांच्याशी थेट बातचीत केलीय आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप यांनी. पाहुया....


Comments

Top