HOME   टॉप स्टोरी

लातूर जिल्ह्यातून तीनशे शिवसैनिक अयोध्येकडे

लातुरात जगदंबेची आरती, व्हाया नांदेड अयोध्येकडे रवाना


लातूर: शिवसेनेच्या अयोध्या स्वारीमुळे सबंध देशभर वेगळे वातावरण तयार झाले आहे. भाजपाला मागे टाकत उद्धव ठाकरे यांनी ही मोहीम आखली. राजुयभरातून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातून सुमारे तिनशेजण अयोध्येकडे निघाले आहेत. काहीजण अयोध्येत पोचले आहेत तर काहीजण दोन तीन तासात अयोध्येत दाखल होतील. लातूर शहरातून ५० जण निघाले आहेत.
यांच्यात जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा प्रमुख सुनिता चाळक, शंकर रांजणकर, श्रीकांत रांजणकर, सौरभ बुरबुरे, विष्णू साबदे, रमेश माळी, दिलीप भांडेकर, सुमित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
निघण्यापूर्वी या शिवसैनिकांनी गंजगोलाईत जगदंबेची आरती केली. त्यानंतर उपस्थित शेकडोजणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्राप्त माहितीनुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब निघाले आहेत. दुपारी दोनच्या सुमारास ते फैजाबादला पोचतील. तिथून पुढच्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात होईल.


Comments

Top