HOME   लातूर न्यूज

त्या शेतकर्‍याच्या प्रकृतीत सुधारणा पण धोका कायम

महावितरणने केली चौकशी समिती नियुक्त, हामंद प्रमुख


त्या शेतकर्‍याच्या प्रकृतीत सुधारणा पण धोका कायम

लातूर: औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी राठोड यांनी महावितरणच्या वागणुकीला कंटाळून उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात विषारी औषध घेतले होते. त्यांच्यावर लातुरच्या आशिर्वाद रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र धोका टळलेला नाही. प्रकृती आणखी धोक्याबाहेर आलेली नाही असे डॉ. घनशाम दरक यांनी सांगितले. राठोड यांना अजुनही व्हेंटीलेटरवरच ठेवण्यात आले आहे. दरम्यान महावितरणने या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. महावितरणचे मुख्य अभियंता राजाराम बुरूड यांनी अधीक्षक डी.डी. हामंद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. एका आठवड्यात अहवाल सादर करावा अशा सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत.


Comments

Top