HOME   लातूर न्यूज

लातूर तालुक्यात सात गावात सुरु झाले पंचनामे

आ. त्र्यंबक भिसे यांनीही केली शेतीच्या नुकसानीची पाहणी


लातूर तालुक्यात सात गावात सुरु झाले पंचनामे

लातूर : काल आलेला अवकाळी पाऊस, जोराचे वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लातूर आलुक्यात वाडी वाघोली, भिसे वाघोली, माटेफळ, खुंटेफळ, मसला, गादवड, रामेगाव आदी गावातून शेतीचे मोठे नुकसान झाले. या गावांचा आढावा घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक कामाला लागले आहेत. दरम्यान ग्रामीणचे आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे यांनीही नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन अधिकार्‍यांना सूचना दिल्या.


Comments

Top