HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. विक्रम काळेंसह पाच आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावले

आ. विक्रम काळेंसह पाच आमदार अतिरेकी हल्ल्यातून बचावले

नवी दिल्ली: पंचायतराज समितीच्या महाराष्ट्रातील पाच आमदारांवर आज काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील बिचबिहारी तालुक्याच्या ठिकाणी अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यातून पाचहीजण सुखरुप बचावले, मात्र रस्त्यावरील सात ते आठ नागरिक जखमी झाले. आमदारांसोबत असलेले बाकी वीसहीजण सुखरुप आहेत. ही घटना तातडीने काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांना कळवण्यात आली. त्यांनी तातडीने अतिरिक्त सुरक्षा पोचवली. त्यानंतर सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. विक्रम काळे यांच्या सोबत दीपक चव्हाण, सुधीर पारवे, तुकाराम काते, सुरेशअप्पा पाटील हे चौघेजण होते. हल्ला झाला त्यावेळी टायर फुटल्याचा संशय आला पण लोकांच्या ओरडण्यामुळे काही वेगळे घडल्याचा अंदाज आला. लोक सैरावैरा पळत होते. त्यांच्यापैकी सात ते आठ जण जखमी झाले होते. त्यानंतर हा अतिरेक्यांचा ग्रेनेड हल्ला होता असे लक्षात आले. आम्ही सारे सुखरुप आहोत असे आ. काळे यांनी सांगितले. या घटनेत गाड्यांचे टायर फुटले, गाडीच्या काचा तडकल्या अशीही माहिती मिळाली आहे.


Comments

Top