HOME   लातूर न्यूज

पाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर

पाऊस चांगला पडला पण आता सगळी भिस्त रबीवर

लातूर: हवामान खात्यानं दिलेले अंदाज कधी कधीच खरे ठरतात. यंदा ९७ टक्के पाऊस ओईल असे सांगण्यात आले. पाऊस याच्यापेक्षाही अधिक होईल पण त्यात समानता नाही. एकीकडे केरळमध्ये गावच्या गावं पाण्याखाली आली अन इकडे मराठवाड्यात पावसाने जवळपास दीड महिना दडी मारली. मागचे दोन दिवस उत्तम पाऊस झाला. पण या पावसाच्या जोरावर पेरणी करता येणार नाही कारण रबीसाठी रान मोकळे होणार नाही. खरीप हातचे गेल्यानंतर रबीवर सर्व शेतकर्‍यांची भिस्त असते. ही रबी चांगली कशी होईल याकडेच सार्‍यांचे लक्ष असते त्यानुसार सप्टेंबर महिना उजाडण्याची प्रतिक्षा सारे करीत आहेत.


Comments

Top