HOME   लातूर न्यूज

जनता पूर्ण त्रस्त, परिवर्तनासाठी पयत्नांची पराकाष्ठा करावी-धिरज देशमुख

जनता पूर्ण त्रस्त, परिवर्तनासाठी पयत्नांची पराकाष्ठा  करावी-धिरज देशमुख

लातूर: राज्य व केंद्र सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे जनता पूर्णपणे त्रस्त झाली असून जनतेला त्यांच्या हक्काचे काँग्रेसचे सरकार मिळवून देण्यासाठी योग्य वेळ आली असून सत्ता परीवर्तनासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य धिरज देशमुख यांनी केली.
काँग्रेस भवन लातूर येथे आयोजित लातूर जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा युवक काँग्रेस पदाधिकारी यांच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. यावेळी प्रदीप राठोड, बादल शेख, विजय निटूरे, दिनेश नवगिरे, महेश काळे, प्रमोद कापसे, अमित जाधव, अजम पठाण, दिपक राठोड, महेश शिंदे, सुरज राजे,रघुनाथ शिंदे, रामहारी गोरे, दिपक काळे, अमोल भिसे, विश्वनाथ कागले, बालाजी वाघमारे यांच्यासह अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा येथील विधानसभा युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थिती होती.
पुढे बोलताना धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात डॉ.मनमोहनसिंग, सोनीया गांधी यांनी देशभरात विविध विकास योजना आखल्या त्या योजनांची अंमलबजावणी आपले नेते श्रध्देय विलासरावजी देशमुख व अन्य काँग्रेस नेत्यांनी प्रभावीपणे या योजना तळागाळापर्यंत राबवल्या. एकीकडे विकासाचे एवढे चांगले काम केलेले असताना सध्याचे केंद्र व राज्यातील भाजप सरकर स्वकेंद्रीत होऊन देश अधोगतीला नेत आहेत. हि बाब देशवासीयांना न परवडणारी असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशात सत्तापरीवर्तनासाठी आता पूर्ण ताकदीने लढा देण्याची वेळ आली आहे असे जि.प.सदस्य धिरज विलासराव देशमुख म्हणाले.
यावेळी युवक काँग्रेसचे निरीक्षक महालिंगप्पा बाबशेट्टी व डॉ.दिनेश नवगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेस, अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा, लातूर ग्राीण विधानसभा युवक काँग्रेस नवनियुक्त पदाधिका­यांचा जि.प.सदस्य धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Comments

Top