HOME   टॉप स्टोरी

पाकिस्तानचा झेंडा जाळला गांधी चौकात

घरात घुसून मारायचं, निषेध करुन बसायचं नाही, युवा सेनेचं आवाहन

पाकिस्तानचा झेंडा जाळला गांधी चौकात

लातूर: काल काश्मीरच्या पुलवामा भागात ४४ भारतीय जवानांना वीर मरण आले. त्यांना मारणार्‍या जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांमागे पाकिस्तान आहे. भारताला अस्थिर करु पाहणार्‍या या घटनेनं सबंध देश संतप्त झाला आहे. त्याचे पडसाद लातुरातही उमटले. आता निषेध करुन श्रद्धांजली वाहायची आणि निमूट बसायचं हे चालणार नाही. जशास तसे उत्तर दिले पाहिजे, त्यांना घरात घुसून मारले पाहिजे असं सांगत लातुरच्या युवा सेनेनं गांधी चौकात पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत हा झेंडा जाळून टाकला. आम्हाला सांगा आम्ही मशीनगन घेऊन सीमेवर जाऊ, सबंध भारतीय जनता पाकिस्तानच्या विरोधात सरकार सोबत आहे असे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी सांगितले. ५६ इंचाच्या छाती सांगणार्‍या या सरकारनं आता बंदुकीच्या भाषेतच बोलावं, सैनिकांचे मृतदेह आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत आम्ही पाहू शकत नाही, सगळे शिवसैनिक सीमेवर लढायला तयार आहेत असे उप जिल्हाध्यक्ष सौरभ बुरबुरे सांगितले.
यावेळी अ‍ॅड. राहूल मातोळकर, अ‍ॅड, रवी पिचारे, आकाश मसाने, विजय धाडके, दिनेश जावळे, संतोष माने, विष्णू तिगिले, अजय गजापोर, अमोल घाडगे, प्रशांत काटे, अजय मदने, अतुल तिडके, सिद्धेश्वर काळजापुरे उपस्थित होते.


Comments

Top