नाशिक दि. 19 फेब्रुवारी : नाशिककरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवू त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास राज ठाकरे यांनी दिला. मनपा निवडणुकीनंतर राज यांनी आज नाशकात येऊन नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. मनसेला या मनपा निवडणुकीत सर्वाधिक 40 जागा मिळाल्या. पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना 62 चा आकडा गाठावा लागणार आहे. यासाठी त्यांना इतर पक्षियांची मदत घ्यावीच लागणार आहे. हे सत्ता समिकरण आताच सांगता येणार नाही असं राज म्हणाले. नाशिक मनापातील 122 पैकी मनसेला 40, राष्ट्रवादीला 20, काँग्रेसला 15, शिवसेनेला 19, भाजपला 14 आणि इतरांनाही 14 जागा मिळाल्या आहेत.