HOME   फोटो फिचर

या विहिरीचं पाणी बोरवटीला किती काळ पुरणार? पुनर्भरण का नाही?

या विहिरीचं पाणी बोरवटीला किती काळ पुरणार? पुनर्भरण का नाही?

लातूर अंबाजोगाई मार्गावरील कायम पाणी टंचाई सोसणार्‍या बोरवटी गावाला या विहिरीतून पाणी पुरवलं जातं. या विहिरीवरच गावाची तहान भागते. ही विहीर बोरवटीकरांच्याच मालकीची आहे. पण ती दिसते कार्निव्हल रिसॉर्टच्या परिसरात. विहीरीच्या चारी बाजुंचा परिसर कॉंक्रीटने पॅक झाला आहे. त्यामुळे या विहिरीचे पाणी वाढत नाही. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानवाल्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी पलकमंत्र्यांनी याच हॉटेलात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाचा कार्यक्रम घेतला होता पण त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही हे दुर्दैव आहे!

Comments

Top