लातूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने कुठेही घाण केली जायची. कचरा टाकला जायचा. यावर आयुक्तांनी नामी उपाय शोधत अशी कायम घाण होणारी ठिकाणे शोधली. त्या ठिकाणी विरंगुळा केंद्रे निर्माण केली. सोबतच लोकांचा विरोध न जुमानता शहरात १९ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली. तुम्ही पाहता ते छायाचित्र सावेवाडीतून कोर्टाकडे जाणार्या मार्गावरील कोपर्यावरचे आहे. मागच्या तीस वर्षांपासून या ठिकाणी घाण केली जायची. आता ती थांबली आहे. या ठिकाणीही बसण्यासाठी सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत. दोन्ही बाजुच्या भिंती स्वच्छता संदेशाने रंगवण्यात आल्या आहेत.
Comments