HOME   लातूर न्यूज

अच्छे दिन शेतकऱ्यांना नव्हे तर सत्ताधार्‍यांना

थापाड्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या - दिलीपराव देशमुख


अच्छे दिन शेतकऱ्यांना नव्हे तर सत्ताधार्‍यांना

राणी अंकुलगा - शेतकऱ्याना चांगले दिवस आणणार अशी भुरळ घालून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. मात्र निवडून आल्यानंतर चार वर्षांत शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिली नाही. सत्ताधारी नेत्यांना मात्र त्यांनी दिलासा कर्जमाफी दिली. या थापा मारणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन माजी क्रिडा युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. मांजरा परिवार शेतकऱ्यांना यावर्षापेक्षा अधिक भाव पुढच्या वर्षी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
देशात ठिकठिकाणी सरकारने सर्वत्र आणिबाणी लागू केल्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. सर्वच क्षेत्रात मंदी आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, व्यापारी, शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांची चांगले दिवस आणतो म्हणून फसवणूक केली आता विचार करण्याची वेळ आली आहे. जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे सर्वांना मदत करणाऱ्या काँग्रेसच्या विचाराला साथ द्या निश्चितपणे सत्ताबदल होणार असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी ग्रामस्थातर्फे मान्य वरांचा सत्कार करण्यात आला.
कार्य़क्रमास डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, अ‍ॅड. त्रिंबक भिसे, अशोक पाटील निलंगेकर, अॅड. विश्वंभर माने, पृथ्वीराज सिरसाठ, आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे, संभाजी रेड्डी, संभाजी सूळ, लक्ष्मणराव मोरे , विजयकुमार पाटील, प्रभाकर बंडगर उपस्थित होते


Comments

Top