HOME   लातूर न्यूज

आदर्श मैत्रीनं फाउंडेशननं ३०० गरिबांना दिली दिवाळी

रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या घरात पोचली मिठाई आणि दिवे


आदर्श मैत्रीनं फाउंडेशननं ३०० गरिबांना दिली दिवाळी

लातूर: आदर्श मैत्री फांऊडेशन लातुरच्या वतीने 'देणे समाजाचे' या उपक्रमांतर्गत या वर्षीची दीपावली अनाथ, गोर-गरीबांच्या घरी आपल्या आगोदर साजरी व्हावी. त्यासाठी 'पेपर रद्दी संकलन' करून त्यातून जमा झालेल्या पैशामधुन लातुर शहरातील कुष्टधाम,विजयनगर झोपडपट्टी, बाभळगाव रोड लगतचे झोपडीधारक अशा ३०० कुटुंबात घरोघरी जाउन आज दीपावली फराळाचे
बॉक्स वाटप करण्यात आले. ज्यांना वर्षाचे बारा महीने सारखेच, सण माहित ना उत्सव, आजचा आलेला दिवस कसा निघेल याची भ्रांत असते. अशा परिस्थितीत काहिजण आजारानेग्रासलेले, उपचारा आभावी अंथरुणात खितपत पडलेले, तर काहिजण मोडक्या झोपडीत लहान थोरासह रोजच जीवन व्यतीत करतात. इतके दुःख, दारिद्रय आसतानाही, ना कुणाकडे तक्रार नाही, ना काही मागणे नाही. खरोखरच या प्रसंगी तेथील वृद्ध पुरुष, महिला, लहान मुले यांच्या हातामध्ये मिठाई चे बॉक्स पडताच त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, अतुलनीय होता.
या प्रसंगी आदर्श मैञी फांऊडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, मकरंद जाधव, चंद्रकांत कातळे, ईश्वर बाहेती, विवेक सौताडेकर, डॉ. उत्तम देशमाने, राघवेंद्र ईटकर, अरविंद औरादे, राऊ सौदापुरे, अशोक तोगरे, आदीसह या उपक्रमास समस्त लातुरवासीयांनीही भरभरुन दाद दिली, शिवाय पेपरची रद्दी, मिठाई देउन आपला सहभागही नोंदवला. अवघ्या आठ दिवसात आदर्श मैत्री फांऊडेशन च्या संचालकाच्या अवाहानास इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल संयोजकांनी आभार मानले आहेत.


Comments

Top