HOME   लातूर न्यूज

सत्संगने पाठवल्या वारकर्‍यांच्या ३० बसेस पंढरपुरला

१९ वे वर्ष, १५०० वारकरी रवाना; अन्न, पाणी अन हरिपाठाचीही सोय


सत्संगने पाठवल्या वारकर्‍यांच्या ३० बसेस पंढरपुरला

लातूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा राजा विठ्ठल आणि रखुमाई यांचे आषाढी एकादशी दिवशी दर्शन घेण्याची ओढ तमाम महाराष्ट्राला असते. लातुरच्या सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी एसटीने पंढरपुरला पाठवण्यात येते. आजही ३० बसेसद्वारे वारकर्‍यांना पंढरपुरला रवाना करण्यात आले. या उपक्रमाचे हे १९ वे वर्ष आहे. वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर सुरेश पवार, निलेश ठक्कर, दिलीप माने, जयप्रकाश दगडे, रामेश्वर बद्दर, रमेश राठी, बालाप्रसाद मुंदडा, आगार प्रमुख यशवंत कानतोडे, स्थानक प्रमुख आरएस सोमवंशी उपस्थित होते. पंढरपुरला जाणार्‍या वारकर्‍यांना भोजन, पाणी आणि हरिपाठही देण्यात आला आहे.


Comments

Top