HOME   लातूर न्यूज

अमरनाथ यात्रेस गेलेल्या नागरिकांची नावे द्या

अतिवृष्टीमुळे अमरनाथ यात्रा बंद, लातुरच्या तहसिल कार्यालयाला अपडेट करा


अमरनाथ यात्रेस गेलेल्या नागरिकांची नावे द्या

लातूर: सद्यस्थितीत देशातील बहुतांश भागात अतिवृष्टी होत असून सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ येथील यात्रा बंद करण्यात आली आहे. लातूर जिल्हयातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. लातूर जिल्हयातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंची माहिती आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेस द्यावी. देण्यात आलेल्या माहितीचे अपडेट्स वेळोवळी द्यावेत असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.


Comments

Top