HOME   लातूर न्यूज

लातुरकरांनी सांगलीकरांना पाठवलं पाणी!

वकिल मंडळाकडून पाण्याच्या हजार बाटल्या आणि बिस्कीटांचे बॉक्सेस


लातुरकरांनी सांगलीकरांना पाठवलं पाणी!

लातूर: ज्या मिरज-सांगली करांनी लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवठा केला होता त्या मदतीची जाण ठेवून लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे पुरग्रस्तांना मदत म्हणून १००० पाण्याच्या बाटल्या व बिस्कीटांचे बॉक्स जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या मार्फत पाठविण्यात आले. एवढ्यावरच न थांबता सांगली मिरज करांना भविष्यात देखील लातूर जिल्हा वकील मंडळ जमेल त्या स्वरुपात सर्वतोपरी मदत करण्यास लातुरकर कटीबद्ध आहेत असे सांगण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा वकील मंडळाचे पदाधिकारी आगरकर, किरण जाधव, सचिन पंचाक्षरी, प्रतिभा कुलकर्णी, अजित चिखलीकर, गणेश गोजमगुंडे, अश्विन पांचाळ, छाया आखाते व ज्येष्ठ सदस्य अण्णाराव पाटील, व्यंकटराव बेद्रे, किरण बडे, प्रदीप पाटील, बालाजी पांचाळ, राजू उपाडे, शिवकुमार जाधव, वैभव बिराजदार, प्रशांत जाधव, अमर जाधव व वकील मंडळाचे सदस्य हजर होते.


Comments

Top