HOME   लातूर न्यूज

विलासरावांनी विकास साधला पण आमदारांनी संपर्क तोडला

अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा दावा, शहरात विविध ठिकाणी गाठी-भेटी


विलासरावांनी विकास साधला पण आमदारांनी संपर्क तोडला

लातूर: लातूरच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे तसेच लातूर जिल्ह्यात व तालुक्यात पायाभूत विकासाचे कार्य माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी त्यांच्या राजकीय काळात केले. परंतु मागच्या दहा वर्षात त्यांच्या पुण्याईवर राजकारणात वावरणार्‍या आमदारांनी विकासाचे कार्य सोडाच जनतेशी संपर्कही ठेवला नाही. आज जनतेला वालीच राहीला नाही अशी भावना जनतेच्या मनात आहे असे प्रतिपादन नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. लातूर शहरात सध्या चालू केलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत जाणकार व प्रतिष्ठित नागरिकांशी ते बोलत होते. कव्हेकर यांनी केशननगर, समर्थनगर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेतल्या. मागच्या दहा वर्षात आमदारांनी कोणती कामे केली? विकासाच्या विविध प्रश्‍नांना जनतेच्या अडचणीला, प्रश्‍नाला गांभिर्याने का पाहिले नाही? लोकप्रतिनिधीच्या कोणत्या जबाबदार्‍या असतात? जनतेच्या प्रश्‍नाला प्राधान्य दिले तर त्यांचे चित्र काय पाहावयास मिळते? असे प्रश्न कव्हेकर यांनी उपस्थित केले.


Comments

Top