HOME   टॉप स्टोरी

लाजिरवाणी बाग, आंबेडकर बाग

अनेक झाडे वाळली, वाळलेली अनेक तोडली, नवी लागवड नाही


लातूर: लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आता शेवटच्या घटका मोजत आहे. कधीकाळी शराचे भूषण असणारे हे उद्यान आता रखरखीत वाळवंटासारखे झाले आहे. सावली देणारी बहुतांश झाडे कधीच नष्ट झालीत. उरल्या सुरल्या झाडांच्या तोकड्या सावलीचा आधार घेण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. या बागेतील २० ते २५ मोठी झाडे वाळल्यामुळे काढण्यात आली. मात्र त्या ठिकाणी नवे रोपण करण्यात आले नाही. ही बाग अगदी मनपासमोर आहे पण त्याकडे कुणाचेच लक्ष नाही....बघा एक रिपोर्ट.


Comments

Top