HOME   टॉप स्टोरी

कॉंग्रेसला गत वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न

दुरावलेला मतदार पुन्हा आणू, लातूर कॉंग्रेसाध्यक्ष व्यंकटराव बेद्रे यांच्याशी बातचीत


लातूर: बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर कॉंग्रेसपासून दुरावलेला मतदार परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, कॉंग्रेसला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वंचित आघाडीमुळे मागच्या निवडणुकीत अडचण झाली होती. पण वंचित आघाडीसोबत विचार विनिमय सुरु आहे. राज्य पातळीवर याचा निर्णय होईल असे लातूर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव बेद्रे यांनी सांगितले. आजलातूरला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
लातूर जिल्ह्यात दलित आणि मुस्लीम बांधवांची संख्या मोठी आहे, काही शहरे मुस्लीम बहुल आहेत. यांच्याबाबत आम्ही एक आराखडा तयार केला आहे. तो राबवला जात आहे. वंचित आघाडी कॉंग्रेस सोबत नाही आली तर मतदार त्याचे आकलन काय करतो हे महत्वाचे ठरते. राष्ट्रीय निवडणुकीतील मुद्दे आणि प्रश्न वेगळे असतात, राज्याच्या निवडणुकातले मुद्दे वेगळे असतात त्याबद्दल मतदार काय विचार करतो हे महत्वाचे ठरते. त्यामुळे मतदाराच्या भूमिकेचा विचार करुन आम्ही चाचपणी केली आहे असेही अ‍ॅड. व्यंकटराव बेद्रे यांनी सांगितले......


Comments

Top