HOME   टॉप स्टोरी

शहर आणि ग्रामीण कुठूनही लढण्यास तयार

पक्षाकडे केली तिकिटाची मागणी, सर्वांना न्याय देऊ- शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर: २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकात कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. याही वेळेस शहर आणि ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. जिथे मिळेल तिथून लढण्यास तयार आहोत अशी माहिती माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली. आज त्यांचा वाढदिवस या निमित्ताने कव्हेकर आजलातूरशी बोलत होते. मराठवाड्याचे आणि लातूर जिल्ह्याचे अनंत प्रश्न आहेत. लोकप्रतिनिधी आणि सरकारही त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आपण आमदार असताना अनेक प्रश्न मार्गी लावले असा दावा त्यांनी केला. मराठवाड्याचा विशेषत: लातुरचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २१ टीएमसी पाण्याची नुसती घोषणा झाली पण थेंबभरही पाणी आले नाही हे सगळे प्रश्न आपण मार्गी लावू असं कव्हेकर म्हणाले...


Comments

Top