HOME   टॉप स्टोरी

वीज मीटर्सच्या विरोधात १९ तारखेला मोर्चा

भारिप बहुजन महासंघाने केले आयोजन, एमआयएमही सोबतीला, सह्यांची मोहीम सुरु


लातूर: महावितरणने बदलून दिलेली नवी वीज मीटर्स अत्यंत दोषपूर्ण आहेत, किंवा ती मुद्दाम दोषपूर्ण ठेवली आहेत. विशिष्ट युनिटनंतर ती वेगाने फिरु लागतात, परिणामी वीज बिले अव्वाच्या सव्वा येऊ लागतात. ही मीटर्स ग्राहकांची संमती घेऊनही ब्सवली गेली नाहीत. याचा निषेध करीत भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने शहरभर सह्यांची मोहीम सुरु केली आहे. सोबतीला एमआयएमही आहे. ही आघाडी येत्या १९ तारखेला लातुरात मोर्चाही काढणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केले आहे.


Comments

Top