HOME   टॉप स्टोरी

आझाद चौकात तात्पुरत्या हौदात विसर्जन

पाणी टंचाई घेतली मनावर, प्रशासनाला केले सहकार्य


लातूर: यंदा लातुरात पाण्याची भीषण टंचाई आहे. ही टंचाई लक्षात घेऊन गणेशाचं विसर्जन नैसर्गिक स्रोतात करु नये लहान गणपतींसाठी हौद बांधावेत आणि मोठे गणपती प्रशासनाकडे द्यावेत किंवा पुढच्या वर्षासाठी सांभाळून ठेवावेत असे आवाहन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आझाद चौकातील भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ, नगरसेवक राजा मनियार यांनी पुढाकार घेत तात्पुरता हौद बांधला, त्यात नागरिकांनी विसर्जन केले.


Comments

Top