HOME   टॉप स्टोरी

संभाजीरावांचा दबदबा नरेंद्र मोदीपर्यंत!

म्हणूनच लातुरात बोगीचा कारखाना आला! रावसाहेब दानवे यांची यार्डात सभा


लातूर: संभाजीराव पाटील निलंगा किंवा लातुरपर्यंत मर्यादीत नाहीत. त्यांचा दबदबा नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आहे. त्यामुळेच लातुरात रेल्वे बोगीचा कारखाना आला. हा कारखाना मला माझ्याही जिल्ह्यात आणता आला नाही. लातुरचे मुख्यमंत्री होते, केंद्रात अवजड उयोग मंत्री होते पण त्यांना हे करता आलं नाही असं प्रतिपादन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं लातुरच्या मार्केट यार्डात भाजप उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. लातुरच्या पाण्याचं काम झालं नाही तर राजीनामा देण्यास तयार आहे असं पुन्हा एकदा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.


Comments

Top