HOME   टॉप स्टोरी

भांबरी चौक अडवला ग्रामस्थांनी

मोठ्या वाहनांनी केला रस्ता खराब, पक्का होईपर्यंत वाहतूक नाही!


लातूर: बसवंतपूर, वरवंटी आणि नांदगावला जोडणार्‍या भांबरी चौकातील रहदारी ग्रामस्थांनी अडवली. हा जिल्हा परिषदेचा रस्ता मुळातच छोटा आहे. त्यावरुन मोठ्या अवजड वाहनांची ये-जा असल्याने हा रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. या रस्त्यांवर खड्ड्यांचे आणि चिखलाचे राज्य झाल्याने रहादारीला मोठे अडथळे येतात. महिला, मुले, वृद्धांना जाणे येणे कठीण होते. याचा निषेध म्हणून या भागातील ग्रामस्थांनी हा रस्ता अडवला. जोपर्यंत हा रस्ता पक्का होत नाही तोपर्यंत रहदारी होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. हे सगळं प्रकरण संपेपर्यंत प्रशासनाचा कुणीही अधिकारी तिकडे फिरकला नाही.


Comments

Top