HOME   टॉप स्टोरी

भाजप अल्पसंख्याक सेलच्या ४० जणांचे राजीनामे

अख्तर शेख यांचा पुढाकार, म्हणतात मुस्लीम घाबरले, भाजपावर विश्वास नाही


लातूर: नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीच्या निषेधार्थ आज भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या ४० पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले. या कायद्यामुळे मुस्लीम समाज धास्तावला आहे हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव आणि माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. भाजपचा आजवरचा मुखडा वेगळा होता तो सर्वमावेशक वाटत होता. आता मात्र अंतरंग कळू लागले आहेत. या पुढची भूमिका सर्व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन घेऊ असं ते म्हणाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अफजलखान, उपाध्यक्ष मन्सूरखान, संघटन सचिव सय्यद फिरोज, सरचिटणीस इम्रान पटेल उपस्थित होते. या सर्वांनी आपापले राजीनामे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांनाही पाठवले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.


Comments

Top