HOME   टॉप स्टोरी

खा. गायकवाड म्हणतात, मुख्यमंत्र्यांवर बोलणार नाही!

१९ नव्या रेल्वे, नऊ हजार कोटींची रस्त्यांची कामे, १५० कोटींचं सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल!


लातूर: मोदींच्या हंटरखाली जवळपास सगळेच खासदार पहिल्यापासूनच सरळ झाले आहेत. ही आनंदाची बाब असली तरी सांगितलं तेवढंच बोलायचं, वादग्रस्त विधाने करायची नाहीत हा शिरस्ता सगळ्याच मतदारसंघातील भाजपाचे खासदार सांभाळत आहेत. त्यानुसार सरकारला चार वर्षे पूर्ण झाली या अनुषंगाने खा. सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारने चार वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. आपण केलेली कामेही त्यांनी सांगितली. लातुरात १९ नव्या ट्रेन आणल्या. नऊ हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरु आहेत. १५० कोटींच्या सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय होत आलं आहे. मोदी यशस्वीपणे काम करीत आहेत. शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम झालं आहे. उज्वला योजनेतून ५२ हजार कुटुंबांना गॅसचे कनेक्षण देण्यात आले अशी माहिती दिली.
पालघर पोटनिवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांची एक ध्वनिफित व्हायरल झाली. यात साम, दाम, दंड, भेद वापरुन ही निवडणूक जिंकायलाच हवी असे मुख्यमंत्री म्हणतात, यावर आपलं काय म्हणणं आहे असा प्रश्न केला असता, आज केवळ सरकारच्या चार वर्षांच्या वाटचालीबाबत बोलेन, मुख्यंत्र्यांवर बोलणार नाही असे गायकवाड म्हणाले.


Comments

Top