HOME   व्हिडिओ न्यूज

'व्हीडीएफ' ने जगवली १८२२ झाडे

आमदार अमित देशमुख यांचा पुढाकार


लातूर: विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील विलासराव देशमुख मार्ग (जुने रेल्वे लाईन) हरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गावर १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाच किलो मीटर म्हणजेच राजस्थान विद्यालय ते लातूर-बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलापर्यंत दुतर्फा २०६७ सहा फुटांची निल गुलमोहराची झाडे लावण्यात आली़, दोन झाडांमध्ये चार मीटर अंतर ठेवण्यात आले़, या झाडांना दर १५ दिवसांला प्रति झाड ६० लिटर पाणी टॅकरद्वारे दिले जाते. आज १८२२ झाडे जगली़ ही झाडे १२ फुटाची झाली आहेत.
आजकाल वृक्षतोड खूप वाढली आहे. लोक सर्रास झाडांवर कुऱ्हाडी चालवत आहेत. जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. याला आपण आळा घातला पाहिजे. वृक्षारोपण केले पाहिजे. २१ मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून साजरा केला जातो. आपणही वैयक्तिक स्तरावर दर वर्षी एक झाड लावलं तर लातूरचे रूपडे बदलून जाईल. असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र ०.४ टक्क्याच्या जवळपास आहे ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळेच लातूरमध्ये वनक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आमदार अमित देशमुख यांच्या माध्यमातून होतो आहे़. वन विभागाच्या लातूर परिक्षेत्रात लातूर, औसा, रेणापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यात एक लाख २० हजार वृक्षांची लागवड करण्याचा शासकीय कार्यक्रम असला तरी आमदार देशमुख यांनी वृक्षलागवडीत पुढाकार घेतला असल्यामुळे येत्या काही वर्षांत वृक्षलागवड व संगोपनात लातूर शहर क्रमांक एकवर राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments

Top