HOME   व्हिडिओ न्यूज

नव्या नागरिकत्व कायद्याला अहमदपुरात विरोध

जमियते उलेमा हिंदने काढला मोर्चा, धरणेही धरली


सादीक शेख, अहमदपूर: नव्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. लखनौ, वाराणसीसह मालेगाव, मुंबईत उग्र निदर्शने झाली. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. याचे पडसाद ग्रामीण भागातही उमटत आहेत. अहमदपुरात जमियते उलेमा हिंदने मूक मोर्चा काढला. निदर्शने आणि धरणे आंदोलनही केले. हा कायदा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत न्याय्य मार्गाने आंदोलन करु हाफीज गालीब आणि मुफ्ती सय्यद फाजील यांनी सांगितले. हा मोर्चा नगरपालिकेपासून तहसीलपर्यंत गेला. या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले होते.


Comments

Top