HOME   व्हिडिओ न्यूज

नागरिकता संशोधन विधेयकाविरोधात मोर्चा आणि निदर्शने

भाजप सरकार देशात धर्माच्या नावावर फूट पाडतंय, मुस्लीम नेत्यांचा आरोप


लातूर: नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात आज लातुरच्या गंजगोलाईतून मोर्चा काढण्यात आला. जमियत उलेमा ए हिंद या संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले होते. भारताच्या समृद्धीत मुस्लिमांचे मोठे योगदान आहे. या देशासाठी अनेक मुस्लीम बांधवांनी प्राणाची आहुती दिली आहे. विद्यमान सरकार धर्माच्या नावावर देशात फूट पाडू पहात आहे. अल्पसंख्याक समाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप मोर्चेकर्‍यांनी केला. याचवेळी गांधी चौकात निदर्शनेही सुरु होती.


Comments

Top