HOME   व्हिडिओ न्यूज

नव्या वीज मिटर्सचा ताप, लातुरकरात संताप

नागरिक हक्क कृती समिती आक्रमक, मार्ग न निघाल्यास बंद


लातूर: महावितरणने बसवलेली नवी वीज मिटर्स नागरिकांवर अन्याय करणारी आहेत. त्यावरुन केली जाणारी वसुली थांबवावी, जुन्या पद्धतीच्या मिटर्सप्रमाणे अ‍ॅव्हरेज बिले द्यावीत अशी मागणी नागरिक हक्क कृती समितीने केली आहे. यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास सहा तारखेला लातूर बंद केले जाईल असाही इशारा देण्यात आला आहे. याबाबत लातुरच्या महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदन देण्यात आले. लातुरातील वीज ग्राहकांना कसलीही पूर्व सूचना न देता मिटर्स बदलण्यात आली. या मिटर्सच्या रिडींग पारदर्शक असतील असा बनाव केला जात आहे. यातून लूट केली जात आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावर उदय गवारे, अशोक गोविंदपूरकर, दीपक सूळ, बसवंत भरडे, अजय कलशेट्टी, प्रदीप गंगणे, दिनेश गिल्डा यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Comments

Top