HOME   महत्वाच्या घडामोडी

मांजरात २० टक्के पाणी, ओल्या दुष्काळाची मागणी, शेतीचे पंचनामे, शाहरुखचा वाढदिवस, पवार म्हणतात पोरखेळ.....०२ ऑक्टोबर २०१९

मांजरात २० टक्के पाणी, ओल्या दुष्काळाची मागणी, शेतीचे पंचनामे, शाहरुखचा वाढदिवस, पवार म्हणतात पोरखेळ.....०२ ऑक्टोबर २०१९

* ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, लातुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढला मोर्चा
* पाईपलाईनने उजनीचे पाणी लातुरला द्या, आ. अमित देशमुख यांची मुख्य सचिवांकडे मागणी
* आ. संजय बनसोडे यांनी प्रशासनासह केली शेतीच्या नुकसानीची पाहणी
* औसाचे उप नगराध्यक्ष जावेद शेख यांनी दिला राजीनामा
* आ. अभिमन्यू पवार यांनी घेतली प्रशासनाची बैठक, शेती नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना
* औसा मतदारसंघात अवैध धंदे खपवून घेणार नाही, आ. अभिमन्यू पवार यांचा इशारा
* लातुरला पाणी पुरवणार्‍या मांजरा धरणात ४१ दशलक्ष घनमीटर पाण्याचा संचय, सुमारे वीस टक्के पाणीसाठा
* भंडारवाडी प्रकल्पात झाला २८ टक्के पाणीसाठा
* नुकसानग्रस्त शेतीची पंचनामे तातडीने करा, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आदेश
* सात नोव्हेंबरपर्यंत येईल भाजपा-सेना युतीचे सरकार- सुधीर मुनगंटीवार
* हिंगोलीत शेतकर्‍यांनी सोयाबीनचे पीक जाळून केला प्रशासनाचा निषेध
* व्हाटसॅप वापरणार्‍यांची माहिती गोपनीय ठेवण्याची व्हाटसॅपने दिली खात्री
* अभिनेता शाहरुख खान याचा आज वाढदिवस
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेऊन शिवसेना सरकार स्थापन करण्याचे संकेत
* महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या नावावर पोरखेळ सुरु- शरद पवार
* महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत कॉंग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
* शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला सोनिया गांधी यांनी नकार दिल्याची सुत्रांची माहिती
* शरद पवार यांनी केला नाशिक दौरा, शेतीच्या नुकसानीची केली पाहणी
* उद्या उद्धव ठाकरे औरंगाबाद दौर्‍यावर, शेतीच्या नुकसानीची करणार पाहणी
* आज मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक, शेती नुकसानीवर होणार चर्चा, शेतकर्‍यांना मदत करण्याचा होईल निर्णय
* आता अरबी समुद्रात मोठे चक्रीवादळ येणार
* काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये, विरोधी पक्षात बसावं, सुशीलकुमार शिंदे यांचा सल्ला
* पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्‍या आरोपीला नागपुरात अटक
* शिवसेनेने भाजपचे सगळे संबंध तोडले तरच पुढच्या पर्यायाचा विचार करु- अशोकराव चव्हाण
* दिल्लीतली हवा बिघडली, आरोग्य आणीबाणी जाहीर, पाच नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद
* अती पावसामुळे राज्यात साठ लाख हेक्टर शेतीचे नुकसान
* मोबाईलची रिंग ३० तर लॅंडलाईनची रिंग ६० सेकंद वाजणे बंधनकारक


Comments

Top